Monday 1 September 2014

Marathi poems

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही
बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..!
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातेनेही तुटणार
नाहीत..!!

🌱🌱

संवाद दोनच माणसांचा होतो,
त्याच्यात तिसरा माणूस आला
की त्या गप्पा होतात..!!

🌱🌱

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात
प्रवाह रुंदावत जातो..!!

🌱🌱

जाळायला काही नसलं तर
पेटलेली काडीसुद्धा अपोआप
विझते..!!

🌱🌱

खर्च झाल्याच दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास
होतो..!!

🌱🌱

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते
शेवटपर्यंत असतात..!
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी
माणस..!
या तिन्ही गोष्टी पलीकडचा
प्रोब्लेम
अस्तित्वातच नसतो..!!

🌱🌱

आठवणी या मुंग्यांच्या
वारुळाप्रमाणे असतात..!
वारूळ पाहून आतमध्ये किती
मुंग्या असतील याचा अदमास
घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की
एकामागोमाग असंख्य मुंग्या
बाहेर पडतात. आठवणींचही
तसंच आहे..!!

🌱🌱

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी
घाबरलेला असतो, बरा झाल्यावर
शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!

🌱🌱

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा
देणारयाची ऐपत नेहमीच कमी
असते..!!

माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!

🌱🌱

बोलायला कुणीच नसण यापेक्षा
आपण बोललेलं समोरच्यापर्यंत
न पोचणं हि शोकांतिका जास्त
भयाण..!!

🌱🌱

No comments:

Post a Comment